सध्या देशात जो विकास दिसतोय आणि या विकासाची चित्रे दाखवली जात आहेत. त्यातले ९० टक्के काम हे नितीन गडकरी यांचे आहे. रस्ते पूल आणि आपल्या सीमेपर्यंतची दळणवळणाची साधने निर्माण झाली, त्याचे श्रेय गडकरी यांना द्यावे लागेल. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाआड राजकारण न आणणारा राष्ट्रीय स्तरावर शरद पवार यांच्यानंतर जर कोणी नेता असेल तर तो म्हणजे नितीन गडकरी
हायलाइट्स:
देशातील विकासाचे ९० टक्के काम हे नितीन गडकरी यांचेच
पवारांनंतर विकासाची दृष्टी असणारा नेता म्हणाजे नितीन गडकरी
ते महाराष्ट्राचे आहेत म्हणून मला त्यांचा सदैव अभिमान
नितीन गडकरी आणि संजय राऊत(फोटो- महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्ताने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नितीन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. "विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाआड राजकारण न आणणारा राष्ट्रीय स्तरावर शरद पवार यांच्यानंतर जर कोणी नेता असेल तर तो म्हणजे नितीन गडकरी", असं ते म्हणाले.
'देशातील विकासाचे ९० टक्के काम हे नितीन गडकरी यांचे'
"सध्या देशात जो विकास दिसतोय आणि या विकासाची चित्रे दाखवली जात आहेत. त्यातले ९० टक्के काम हे नितीन गडकरी यांचे आहे. रस्ते पूल आणि आपल्या सीमेपर्यंतची दळणवळणाची साधने निर्माण झाली, त्याचे श्रेय गडकरी यांना द्यावे लागेल. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाआड राजकारण न आणणारा राष्ट्रीय स्तरावर शरद पवार यांच्यानंतर जर कोणी नेता असेल तर तो म्हणजे नितीन गडकरी", असं म्हणत संजय राऊतांनी नितीन गडकरींवर स्तुती सुमनं उधळली.
"ते महाराष्ट्राचे आहेत म्हणून मला त्यांचा सदैव अभिमान आहे. देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे योगदान काय, हे नितीन गडकरी यांनी केलेल्या गेल्या सात वर्षांतील कामांमधून आपल्याला दिसून येईल. नितीन गडकरी हे जरी भारतीय जनता पक्षाचे नेते असले, तरी देशातला प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता हा त्यांचा चाहता आहे. गडकरींच्या टीकाटिपणीमध्ये कधी विखार नसतो. ते स्वभावाने फटकळ आहेत. पण मनाने निर्मळ आहेत. मी त्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या पक्षातर्फे उदंड आणि निरोगी आयुष्य चिंतितो", असं म्हणत त्यांनी नितीन गडकरींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, पण ही माघार नाही | छत्रपती संभाजीराजे
लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.... आणखी वाचा
संभाषण सुरू करा
marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज